जहाल महिला माओवादीने केले गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण ! शासनाने जाहिर केले होते एकुण ११ लाख रूपयाचे ईनाम.

0
36

गडचिरोली:-सनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ५८६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच एकुण ११ लाख रुपये बक्षीस असलेली जहाल महिला माओवादी नामे रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी, वय २८ वर्ष रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले.आत्मसमर्पीत महिला माओवादी सदस्याबाबत माहिती नामे रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी माहे ऑगस्ट २००९ ला फरसेगड दलममध्ये सदस्या पदावर भरती होऊन सन २०१० पर्यंत कार्यरत होती.सन २०१० ला ओरच्छा दलममध्ये बदली होऊन सन २०१३ पर्यंत कार्यरत होती.. सन २०१३ ला नॅशनल पार्क एरीया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम (एरीया कमीटी मेंबर)पदावर पदोन्नती होऊन सन २०१५ पर्यंत कार्यरत होती.सन २०१५ ला सांड्रा दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत.’कार्यकाळात केलेले गुन्हे चकमक – ४ सन २०१५ मध्ये मौजा गुंडम जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.सन २०१७ साली मौजा बेज्जी ते येर्रागुफा मार्गावरील अॅम्ब्युश/ चकमकीमध्ये सहभाग. यामध्ये डीआरजी (छ.ग.) चे १२ पोलीस जवान शहिद झाले होते. सन २०१८ मध्ये मौजा मारेवाडा जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.सन २०१९ मध्ये मौजा बोरामज्जी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग. खून- १ सन २०२०-२१ मध्ये मौजा उपराल (छत्ती.) येथील एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. जाळपोळ – १सन २०१८ मध्ये मौजा बेद्रे रोडवर सरकारी बसची जाळपोळ करण्यात तिचा सहभाग होता.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे. दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतःसाठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते..वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. • पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झालाखबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वतःच्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.शासनाने जाहिर केलेले बक्षीस.महाराष्ट्र शासनाने रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचेवर ०६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. छत्तीसगड सरकारने रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचेवर ०५ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिला एकुण ४ लाख ५० हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२३ सालामध्ये आतापर्यंत एकुण १३ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here